Skip to main content

Posts

होय आम्ही आमचे मूळ विसरलोय.....

लिहिण्यास कारण की :  पुणे विद्यापीठात झालेल्या उत्कर्षाच्या कार्यक्रमाला मी पूर्णवेळ पुणे विद्यापीठाच्या मार्फत माध्यमांचा प्रतिनिधी कार्यक्रमांचे वार्तांकन करत होतो. त्यादरम्यान पुणे विद्यापीठाच्या संघाची थीम 'वारकरी संप्रदाय' यावर आधारित होती. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठाच्या पथ्यनाट्याचे नाव होते "होय आम्ही आमचं मूळ विसरलोय" त्यामध्ये संत साहित्यातील आशय काढून भाष्य केले होते आणि आजच्या घडीला संत साहित्य किती कालसुसंगत आहे यावर उत्तमरित्या भाष्य केले होते. मग मी विचार केला 'आपल्याला किती संत साहित्य माहिती आहे?' किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली आणि समर्थ रामदास स्वामीनी दासबोध लिहिली हे माहित आहे. संत साहित्यांची नावच आपल्याला माहित आहे त्या पलीकडे जाऊन कधी आपण त्याला वाचण्याचा प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न मनाला भेडसावत होता. मग खरंच वाटायला लागलं की आपण आपलं मूळ विसरत चाललोय. आपलं म्हणजे असं झालं आहे की घरात ज्ञानरूपी सोन्याची खान असताना, आपण फक्त ऊर भरून अभिमानच बाळगायचा "संत साहित्य ड...
Recent posts

एक प्राणी लुप्त होत चालला आहे

लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती: आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य.  आर्थिक बाजू आणि शेळ्या: आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्य...

"मराठी न्यूज पोर्टल्सची कार्यक्षमता: संक्षिप्ततेपासून संवादापर्यंत एक तुलनात्मक अध्ययन"

खाली तीन प्रमुख मराठी न्यूज पोर्टल्स – लोकसत्ता , सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स – यांचे “ब्रीव्हिटी, अ‍ॅडप्टबिलिटी, स्केलेबिलिटी, इंटरऐक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन” या निकषांवर तपशीलवार विश्लेषण करून एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. प्रस्तावना डिजिटल युगात वाचकांच्या बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे न्यूज पोर्टल्सना वेगवान, सहज वाचनीय, सर्वसमावेशक आणि संवादात्मक असणे अनिवार्य झाले आहे. या रिपोर्टमध्ये तीन प्रमुख मराठी न्यूज पोर्टल्स – लोकसत्ता, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स – यांच्या विविध पैलूंवर आधारित विश्लेषण केले गेले आहे. 1. ब्रीव्हिटी (Brevity) लोकसत्ता: बातम्या साध्या आणि स्पष्ट भाषेत सादर केल्या जातात. लेख लहान, मुद्देसूद आणि वाचकांना त्वरीत महत्त्वाची माहिती देण्यावर भर दिला जातो. सकाळ: सकाळमध्ये लेख संक्षिप्तपणासोबतच वाचकांना आवश्यक त्या संदर्भानुसार सखोल माहिती देखील दिली जाते. मुख्य मुद्दे लगेच समजतात परंतु कधी कधी सखोल विश्लेषणासाठी अतिरिक्त मजकूर असू शकतो. महाराष्ट्र टाइम्स: या पोर्टलवर अनेकदा माहिती सादर करण्याची शैली थोडी विस्तृत असते, जी कधीकधी स...