लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती:
आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य. आर्थिक बाजू आणि शेळ्या:
आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्या असणारा प्राणी म्हणजे शेळी.पण ज्यांच्या शेळ्या असतात त्यांना समाज रचनेनुसार जरी स्त्रीला लक्ष्मी समजाव लागतं असलं तरी शेळी असणाऱ्यांना बोकड जन्मल्यावरच लक्ष्मी दिसते हीच ह्या समाजाची खासियत आहे. पैसा ह्या आयुष्यात फक्त गोष्ट आहे, ज्याला कोणाची गरज नसते. पण सगळ्यांना त्याची गरज असते. त्यामुळे विगन आणि व्हेज असणारे का मारता प्राण्याला विचारत असतात. शेतकरी उद्योगधंदे आहेत हे, जर हे बंद केले तर शेतकऱ्याला फक्त अन्न म्हणून पाणी पिऊनच झोपाव लागेल. खरंच विचार करायची गोष्ट आहे आपल्या देशात 5 किलो तांदूळ आणि गहू घ्याव लागतंय शेतकऱ्याला त्याला कृषिप्रधान कस म्हणावं. सामाजिक स्थिती एवढी खराब आहे आपल्या देशात शेतकरी हा आर्थिक दुबळा मनुष्य बनवला गेला आहे, व्यवस्थेमध्ये बदल न झाल्यामुळे. विचार करा अन् सोडून द्या.
वैयक्तिक मत :
आतली गोष्ट सांगतो, बोकडाची नळी आणि मटण, चाप खाण्यात जी मज्जा आहे ना, ती नरकात यमराजाकडून तेलात तळून घेण्यात सुद्धा नाही. मुळात माणूस स्वजातीय हिंसा करत असतो, परजातीय हिंसा करणार यात शंकाच नाही. माणसाच्या प्रवृत्तीला प्रेरित होऊन कुत्रीसुद्धा पिसाटतात अन् आजकाल त्यांनी सुद्धा परजातीय हिंसा सुरू केली. शेळ्यांची पिल्ली फाडून खाणे त्यांनी त्यांचा धर्म बनवला आहे. म्हणून म्हणतोय मटण खाण्याची वासना पूर्ण केल्याशिवाय मरू नका तसे आपण पाप रोजच करत असतो पण ते कसे तर सूक्ष्म कीटक आपल्या पायामुळे रोज मरत असतात त्यामुळे वशाटप्रेमी लोकांनी आपली वासना कोल्हापुरी लोकासारखी केली पाहिजे अन् खच्चून अन् बक्कळ मटण खाल्लं पाहिजे ह्या शुभेच्छा. मी मोठा मटनप्रेमी असल्यामुळे संधी मिळाली की सोने केल्याशिवाय राहत नाही.
बालमनाचा कवी आणि निरोप:
माझ्या मनाला उमगलेले एकच ते म्हणजे
शेळ्यांनो जरा माघे फिरा,
तुमच्या मागे गवताचा हिरा.
तुमचे पोट होईल मग टमबारे,
आता पैसे येतील आमच्याकडे बरे.
तुमच्यामुळे वाढले हॉटेलचं पसारे,
आता खालले जाईल मटणचं सारे.
कवितेचा आशय जर नाही समजला तर आपआपल्या सोयीचा अर्थ लावून वाचणारेने मोकळे व्हावे, कारण कवी कारणं देण्यासाठी अजिबात उत्साही नाहीये. ही दखल मात्र घेण्यात यावी. आवडला तर कमेंट करायला विसरू नका.....
रजा घेतो,
धन्यवाद,
आपलाच सारंग...
Comments
Post a Comment