Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

क्रांतीसुर्य शंभूराजा राजाभिषेक सोहळा अनुभूती

छातीचा बुरुज अन कुऱ्हाडीची तलवार करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती जाहले ! राज्याभिषेक म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तो स्वाभिमान, पराक्रम आणि स्वराज्याच्या वचनाचा पुनस्मरण सोहळा आहे. यंदाही १६ जानेवारी रोजी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर हा सोहळा अनुभवणं म्हणजे एक विलक्षण आत्मिक समाधान आणि प्रेरणादायी क्षण!   रायगडवारी म्हणजे मनाला उभारी "रायगडवारी म्हणजे मनाला उभारी" असं का म्हणतात, हे यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याने पुन्हा सिद्ध केलं. हा केवळ इतिहासाचा सोहळा नसून, आजच्या पिढीने आपली निष्ठा आणि लढण्याची उर्मी जिवंत ठेवण्याचा दिवस आहे. १५ जानेवारीपासूनच रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांची मालिका सुरु झाली होती. गडकिल्ले संवर्धन समितीने फुलांच्या सजावटीची जबाबदारी पार पाडली, तसेच "राष्ट्रप्रथम" उपक्रमांतर्गत जलाभिषेकाचा मान देखील मिळाला.   छत्रपती संभाजी महाराज – क्रांतीचे अधिष्ठान धाकलं धनी छत्रपती झालं, क्रांतीचे अधिष्ठान, क्रांतीसूर्य श...

"गडाचा राजा राजियाचा गड - दुर्गराज राजगड"

"सुखाची व्याख्या कितीही आणि  कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीतच येतो... #मी_राजगड "राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥ दोन तपे कारोभारी।जयावरी राहिले॥" या दोन ओळीत सारं असणारा म्हणजेच राजगड किल्ला पहिले २६ वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला सह्याद्रीमधील मुरुंब देवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे.नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुब्देवाचा डोंगर उभा आहे. किल्यावर सुवेळा माची,गुंजवणे दरवाजा,आळू दरवाजा आणि पाली दरवाजे,संजीवनी माची,पद्मावती माची या तीन माच्या व तीन दरवाजे आहेत हे सर्व पहिल्या ओळीचा स्पष्टीकरण आहे. तसेच दुसरी ओळ सांगते या दुर्गराजाला दोन सदरा म्हणजे कार्यालय आहेत व "गडांचा राजा " आणि "राजांचा गड " असा बहुमान मिळवलेला राजगड हा शिवकालीन इतिहासातील महत्वाचा गिरीदुर्ग आहे. राजधानी अशी बनवा की चार लोक बोलले पाहिजेत आगाबाबोव ढगात तर आलो नाय आपण महाराष्ट्रात असलेल्या दोन स्वर्गा पैकी असणारा एक म्हणजे दुर्ग राजगड...दुर्ग हा शब्द सुद्धा छत्रपतीच्या मराठी शब्दकोषातून दिला गेलेला शब...

त्रिशुंड गणपती मंदिर - पुण्याचे दुर्लक्षित रत्न

पुण्यातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर हे एक अनोखे रत्न आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, त्याच्या स्थापत्यशैलीतून आणि शिल्पांमधून प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या तीन सोंड असलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रसिद्ध आहे.                सौजन्य : Google.com मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यशैली मंदिराच्या उभारणीची सुरुवात शहाजीराजांच्या काळात झाली, तर १७७०च्या सुमारास इंदूरजवळील गोसावी भीमनिपजी यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या मंदिराच्या रचनेत राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतातील वास्तुशैलींचा मिलाफ दिसून येतो. पूर्ण दगडी बांधकाम, उंच प्रवेशद्वार आणि दाराच्या चौकटीवरील शिल्पे यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेला वेगळेपण प्राप्त झाले आहे.             सौजन्य : Google.com प्रवेशद्वारावरील शिल्पे आणि राजकीय दृष्टिकोन मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत - शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर आणि दशावतार. मात...