Skip to main content

त्रिशुंड गणपती मंदिर - पुण्याचे दुर्लक्षित रत्न

पुण्यातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर हे एक अनोखे रत्न आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, त्याच्या स्थापत्यशैलीतून आणि शिल्पांमधून प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या तीन सोंड असलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रसिद्ध आहे.

              
सौजन्य : Google.com

मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यशैली
मंदिराच्या उभारणीची सुरुवात शहाजीराजांच्या काळात झाली, तर १७७०च्या सुमारास इंदूरजवळील गोसावी भीमनिपजी यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या मंदिराच्या रचनेत राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतातील वास्तुशैलींचा मिलाफ दिसून येतो. पूर्ण दगडी बांधकाम, उंच प्रवेशद्वार आणि दाराच्या चौकटीवरील शिल्पे यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेला वेगळेपण प्राप्त झाले आहे.

            सौजन्य : Google.com

प्रवेशद्वारावरील शिल्पे आणि राजकीय दृष्टिकोन
मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत - शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर आणि दशावतार. मात्र, सर्वांत लक्षवेधी आहे ते राजकीय दृष्टिकोन असलेले एक विशेष शिल्प. एका इंग्रज शिपायासह बंगाल आसामचे प्रतीक असणाऱ्या शिल्पातून तत्कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिकात्मक चित्रण आहे. ब्रिटिश सत्तेचा प्रभाव वाढत असल्याचे या शिल्पातून सूचित केलेले दिसते.

त्रिशुंड गणेशाची खास मूर्ती
गर्भगृहात विराजमान असलेली गणेशाची मूर्ती इतरांपेक्षा अगदी वेगळी आहे. या मूर्तीला तीन सोंडा आहेत आणि सहा हात असून, ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मोरावर बसलेल्या या गणेशमूर्तीचे दर्शन पुण्यात फार क्वचितच पाहायला मिळते. तिच्या हातात अंकुश, परशू आणि मोदक पात्र आहे, तर पाठीमागे शेषशायी नारायणाचे शिल्प कोरलेले आहे. मंदिराचा स्थापत्य उद्देश शिवमंदिरासारखा असला, तरी कालांतराने गणेशाची स्थापना करण्यात आली, असे मानले जाते.

शिवलिंग आणि लिंगोद्भव शिल्प

मंदिराच्या मागील भागात एक विशेष शिवलिंग आहे, ज्यावर लिंगोद्भव कथा आधारित शिल्प साकारलेले आहे. पुराणातील ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेवर आधारित असलेल्या या शिल्पातून शिवाची महत्ता अधोरेखित करण्यात आली आहे. ब्रह्मा हंसाच्या रुपात आणि विष्णू वराह रुपात आद्य आणि अंत शोधण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना तो सापडत नाही. हे शिल्प शिवाच्या लिंगोद्भव रूपाची कथा सांगते.

         सौजन्य : Google.com

तळघरातील जिवंत झरा आणि मंदिर व्यवस्थापन
मंदिराच्या तळघरात एक जिवंत झरा आहे, जो दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ करून भाविकांसाठी उघडला जातो. हा झरा मंदिराच्या अद्वितीयतेत भर घालतो. मंदिराला विश्वस्त मंडळाकडून उत्तम देखरेख मिळते, ज्यामुळे मंदिराची कला आणि शिल्पे सुरक्षित आहेत.

एक दुर्लक्षित पण अनमोल ठेवा
अप्रतिम स्थापत्य, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातील एक दुर्लक्षित ठेवा आहे. बहुतांश लोकांना या मंदिराविषयी माहिती नसल्यामुळे भाविकांची गर्दी कमी असली, तरी याची कला, इतिहास आणि पौराणिकता याला अधिक महत्त्व देते.

पुण्यातील भाविकांनी आणि पर्यटकांनी एकदा तरी या मंदिराला भेट देऊन, त्याची अनमोलता अनुभवायला हवी. त्रिशुंड गणपती मंदिराच्या माध्यमातून आपल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्याचे आणि याचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आपल्यासाठी गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

एक प्राणी लुप्त होत चालला आहे

लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती: आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य.  आर्थिक बाजू आणि शेळ्या: आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्य...

अर्थसाक्षरतेसाठी एक पाऊल पुढे – पुणे विद्यापीठाचे अर्थसंकल्पीय प्रदर्शन

  केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26: पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो, परंतु तो सर्वसामान्य नागरिकांसाठी समजणे कधीही सोपे नसते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी यंदा हा दुरावा मिटवण्यासाठी एक अनोखी संकल्पना राबवली. त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित एक विशेष प्रदर्शन भरवले, जिथे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजावून सांगण्यात आले. प्रदर्शनाची संकल्पना आणि उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातील गुंतागुंतीच्या संकल्पना आणि धोरणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अर्थसंकल्पातील शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. प्रदर्शनातील ठळक वैशिष्ट्ये या प्रदर्शनात अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील महत्त्वाच्...