Skip to main content

क्रांतीसुर्य शंभूराजा राजाभिषेक सोहळा अनुभूती

छातीचा बुरुज अन कुऱ्हाडीची तलवार करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती जाहले !

राज्याभिषेक म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तो स्वाभिमान, पराक्रम आणि स्वराज्याच्या वचनाचा पुनस्मरण सोहळा आहे. यंदाही १६ जानेवारी रोजी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली. शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर हा सोहळा अनुभवणं म्हणजे एक विलक्षण आत्मिक समाधान आणि प्रेरणादायी क्षण!

 


रायगडवारी म्हणजे मनाला उभारी

"रायगडवारी म्हणजे मनाला उभारी" असं का म्हणतात, हे यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्याने पुन्हा सिद्ध केलं. हा केवळ इतिहासाचा सोहळा नसून, आजच्या पिढीने आपली निष्ठा आणि लढण्याची उर्मी जिवंत ठेवण्याचा दिवस आहे.

१५ जानेवारीपासूनच रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांची मालिका सुरु झाली होती. गडकिल्ले संवर्धन समितीने फुलांच्या सजावटीची जबाबदारी पार पाडली, तसेच "राष्ट्रप्रथम" उपक्रमांतर्गत जलाभिषेकाचा मान देखील मिळाला.


 

छत्रपती संभाजी महाराज – क्रांतीचे अधिष्ठान

धाकलं धनी छत्रपती झालं,
क्रांतीचे अधिष्ठान,
क्रांतीसूर्य शंभूराजा,
निष्ठेची फुले आम्ही इथे वाहतो...

शंभूराजांचे जीवन म्हणजे शौर्य, धैर्य आणि निष्ठेचा कळस. कधीही शरण न जाणारा, हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावणारा हा राजा आदर्श वीरपुरुष आहे.

"शंभू राजांची मुद्रा सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी"

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

🔥 मराठीत अर्थशंभूराजांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी झळाळते. ही मुद्रा सर्वत्र गाजणारी आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी तिचा अंमल अमर राहील.

सोहळ्याचे वैशिष्ट्य

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत गगनभेदी "जय भवानी, जय शिवाजी"च्या घोषणा घुमल्या.
संभाजी महाराजांच्या विचारधारेचे स्मरण करून नवा उत्साह संचारला.
शंभू राजांचे पराक्रम, त्यांचे स्वराज्यासाठी योगदान यांचे महत्त्व पटवून देणारे व्याख्यान.

शंभूराजे आणि प्रेरणा

रायगडावरील सोहळा केवळ ऐतिहासिक घटना नाही, तर ज्वलंत प्रेरणास्त्रोत आहे.

फितुरी वाट्याला आली तरी मनगटात निश्चय साठवायचा आहे.
लढण्याची भीती वाटली, तर फक्त शंभू महाराजांचं कर्तृत्व आठवायचं आहे.
कर्तव्य म्हणून रायगडाकडे यायचं आणि अमर आठवणी घेऊनच उतरायचं.

"आमचा देव जिथे राहिला, तिथे स्वर्ग तयार झाला!"

लोक म्हणतात, "देव स्वर्गात राहतात", पण शिवभक्त म्हणतात,
"आमचा देव जिथे राहिला, तिथे स्वर्ग तयार झाला!"

रायगडाचा वारा, तो दरबार, ती सोहळ्याची ऊर्जा... हे सगळं अनुभवलं की जाणवतं, रायगड फक्त गड नाही, तो श्रद्धेचा किल्ला आहे!

|| राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मुजरा! ||

🔱 हर हर महादेव! जय शंभूराजे! 🔱

Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल  मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...