Skip to main content

"गडाचा राजा राजियाचा गड - दुर्गराज राजगड"

"सुखाची व्याख्या कितीही आणि कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीतच येतो...#मी_राजगड

"राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥
दोन तपे कारोभारी।जयावरी राहिले॥"
या दोन ओळीत सारं असणारा म्हणजेच राजगड किल्ला पहिले २६ वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला सह्याद्रीमधील मुरुंब देवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे.नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुब्देवाचा डोंगर उभा आहे. किल्यावर सुवेळा माची,गुंजवणे दरवाजा,आळू दरवाजा आणि पाली दरवाजे,संजीवनी माची,पद्मावती माची या तीन माच्या व तीन दरवाजे आहेत हे सर्व पहिल्या ओळीचा स्पष्टीकरण आहे. तसेच दुसरी ओळ सांगते या दुर्गराजाला दोन सदरा म्हणजे कार्यालय आहेत व "गडांचा राजा " आणि "राजांचा गड " असा बहुमान मिळवलेला राजगड हा शिवकालीन इतिहासातील महत्वाचा गिरीदुर्ग आहे. राजधानी अशी बनवा की चार लोक बोलले पाहिजेत आगाबाबोव ढगात तर आलो नाय आपण महाराष्ट्रात असलेल्या दोन स्वर्गा पैकी असणारा एक म्हणजे दुर्ग राजगड...दुर्ग हा शब्द सुद्धा छत्रपतीच्या मराठी शब्दकोषातून दिला गेलेला शब्द आहे म्हणजेच याचा अर्थ दुर्गम निगम म्हणजेच अवघड रस्ता एक हिंदी भाषिक कार्यकर्ता बोलला आम्ही गड चढत असताना ये सैनिक कैसे चढते होंगे मी सांगितलं त्याला "सैनिक नही मराठी मावळे चढते थे" का जायचं राजगडावर हा प्रश्न आला तर महाराज आणि त्यांचं व्यवस्थापन ४५० वर्षांपूर्वी सुद्धा पाण्याचं उत्तम नियोजन आहे ते मग तिन्ही माच्या असो किंवा बालेकिल्ला आपण आजकाल बघतो महाराष्ट्रात नेतेची पाण्यावर मते काय आहेत... मला वाटत की अजूनही या गडाच्या दगड धोंड्यात आपला राजा अजून जिवंत आहे...

Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल  मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...