Skip to main content

"गडाचा राजा राजियाचा गड - दुर्गराज राजगड"

"सुखाची व्याख्या कितीही आणि कशीही बदलली तरी तिचा अंतिम शेवट सह्याद्रीतच येतो...#मी_राजगड

"राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥
दोन तपे कारोभारी।जयावरी राहिले॥"
या दोन ओळीत सारं असणारा म्हणजेच राजगड किल्ला पहिले २६ वर्ष मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला सह्याद्रीमधील मुरुंब देवी डोंगर माथ्यावर बांधला गेला आहे.नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुब्देवाचा डोंगर उभा आहे. किल्यावर सुवेळा माची,गुंजवणे दरवाजा,आळू दरवाजा आणि पाली दरवाजे,संजीवनी माची,पद्मावती माची या तीन माच्या व तीन दरवाजे आहेत हे सर्व पहिल्या ओळीचा स्पष्टीकरण आहे. तसेच दुसरी ओळ सांगते या दुर्गराजाला दोन सदरा म्हणजे कार्यालय आहेत व "गडांचा राजा " आणि "राजांचा गड " असा बहुमान मिळवलेला राजगड हा शिवकालीन इतिहासातील महत्वाचा गिरीदुर्ग आहे. राजधानी अशी बनवा की चार लोक बोलले पाहिजेत आगाबाबोव ढगात तर आलो नाय आपण महाराष्ट्रात असलेल्या दोन स्वर्गा पैकी असणारा एक म्हणजे दुर्ग राजगड...दुर्ग हा शब्द सुद्धा छत्रपतीच्या मराठी शब्दकोषातून दिला गेलेला शब्द आहे म्हणजेच याचा अर्थ दुर्गम निगम म्हणजेच अवघड रस्ता एक हिंदी भाषिक कार्यकर्ता बोलला आम्ही गड चढत असताना ये सैनिक कैसे चढते होंगे मी सांगितलं त्याला "सैनिक नही मराठी मावळे चढते थे" का जायचं राजगडावर हा प्रश्न आला तर महाराज आणि त्यांचं व्यवस्थापन ४५० वर्षांपूर्वी सुद्धा पाण्याचं उत्तम नियोजन आहे ते मग तिन्ही माच्या असो किंवा बालेकिल्ला आपण आजकाल बघतो महाराष्ट्रात नेतेची पाण्यावर मते काय आहेत... मला वाटत की अजूनही या गडाच्या दगड धोंड्यात आपला राजा अजून जिवंत आहे...

Comments

Popular posts from this blog

त्रिशुंड गणपती मंदिर - पुण्याचे दुर्लक्षित रत्न

पुण्यातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर हे एक अनोखे रत्न आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, त्याच्या स्थापत्यशैलीतून आणि शिल्पांमधून प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या तीन सोंड असलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रसिद्ध आहे.                सौजन्य : Google.com मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यशैली मंदिराच्या उभारणीची सुरुवात शहाजीराजांच्या काळात झाली, तर १७७०च्या सुमारास इंदूरजवळील गोसावी भीमनिपजी यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या मंदिराच्या रचनेत राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतातील वास्तुशैलींचा मिलाफ दिसून येतो. पूर्ण दगडी बांधकाम, उंच प्रवेशद्वार आणि दाराच्या चौकटीवरील शिल्पे यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेला वेगळेपण प्राप्त झाले आहे.             सौजन्य : Google.com प्रवेशद्वारावरील शिल्पे आणि राजकीय दृष्टिकोन मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत - शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर आणि दशावतार. मात...

एक प्राणी लुप्त होत चालला आहे

लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती: आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य.  आर्थिक बाजू आणि शेळ्या: आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्य...

अर्थसाक्षरतेसाठी एक पाऊल पुढे – पुणे विद्यापीठाचे अर्थसंकल्पीय प्रदर्शन

  केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26: पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो, परंतु तो सर्वसामान्य नागरिकांसाठी समजणे कधीही सोपे नसते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी यंदा हा दुरावा मिटवण्यासाठी एक अनोखी संकल्पना राबवली. त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित एक विशेष प्रदर्शन भरवले, जिथे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजावून सांगण्यात आले. प्रदर्शनाची संकल्पना आणि उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातील गुंतागुंतीच्या संकल्पना आणि धोरणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अर्थसंकल्पातील शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. प्रदर्शनातील ठळक वैशिष्ट्ये या प्रदर्शनात अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील महत्त्वाच्...