Skip to main content

प्राचीन ज्ञानाचा अनमोल ठेवा: भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट

पुणे शहर म्हणजे केवळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं ठिकाण नाही, तर इतिहासाच्या गाभ्यात डोकावण्याची संधी देणारं एक अनमोल रत्नही आहे – भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI). प्राचीन भारतीय साहित्य, हस्तलिखिते, संशोधन आणि अभिजात संस्कृती यांचा अनमोल ठेवा जपणाऱ्या या संस्थेचा एक अभ्यासदौरा मला घडला आणि त्यानंतर या संस्थेबद्दलचं माझं दृष्टिकोनच बदलून गेला.




संस्थेचा गौरवशाली इतिहास

ही संस्था १९१७ साली प्राच्यविद्येचे महान संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्थापन करण्यात आली. संस्थेने भारतीय परंपरा, इतिहास आणि शास्त्र यांचं संरक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेचा संचालक आणि व्यवस्थापक निखिल गाडगीळ सर यांनी आम्हाला या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.

संस्थेच्या स्थापनेमध्ये अनेक अभ्यासक आणि विचारवंतांचा हातभार होता. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीपासून ते वेदविद्या आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासापर्यंत, विविध संशोधन प्रकल्प येथे पार पडले आहेत.


भांडारकर इन्स्टिट्यूटचा ठेवा आणि संशोधन कार्य

BORI कडे भारतातील काही सर्वात मोठे आणि दुर्मिळ प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित संग्रह आहेत. संस्थेकडे १,६०,००० हून अधिक पुस्तके आणि २८,००० पेक्षा अधिक हस्तलिखिते आहेत. यामध्ये संस्कृत, प्राकृत, भारतीय प्रादेशिक भाषा आणि काही युरोपियन भाषांतील प्राचीन ग्रंथांचा समावेश आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये:

✅ ग्रंथालयात साठवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा
✅ हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी विशेष रासायनिक प्रयोगशाळा
अम्फिथिएटर, जिथे विविध अभ्यासविषयक व्याख्याने घेतली जातात
जैन गार्डन, एक सुंदर आणि शांत परिसर
✅ पांडुरंग वामन काणे – साहित्य क्षेत्रातील भारतरत्न मिळवणारे एकमेव संशोधक


संस्थेमध्ये शिकण्यासारखं काय आहे?

संस्था केवळ प्राचीन ग्रंथसंग्रहासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे विविध अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवले जातात. काही प्रमुख अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत:

📖 वेदविद्या – भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी
📖 भारतीय दर्शनशास्त्र एक परिचय – भारतातील विविध तत्त्वज्ञान शाखांचा अभ्यास
📖 प्रवास महाभारत – महाभारताच्या विविध पैलूंची सखोल माहिती
📖 कालिदास आणि भाषा – संस्कृत काव्य आणि नाट्य परंपरेचा अभ्यास
📖 पुरातत्त्वशास्त्राची मूलभूत तत्त्वे – इतिहास आणि पुराणात रस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम


महाभारत प्रकाशन आणि निजामाची देणगी

महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या प्रकाशनासाठी संस्थेला हैदराबादच्या सातव्या निजाम मीर उस्मान अली खान यांनी मोठे अनुदान दिले होते. ११ वर्षांसाठी प्रतिवर्षी १००० रुपये आणि अतिथिगृहाच्या बांधकामासाठी ५०,००० रुपये असे मोठे सहकार्य त्यांनी केले होते.

BORI ने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यासाठी विष्णू सीताराम सुखठणकर यांची संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या संशोधनाच्या दर्जामुळे संपूर्ण जगभरातून BORI ला मान्यता मिळाली.


BORI भेटीतील वैयक्तिक अनुभव



रानडे इन्स्टिट्यूटच्या Culture Journalism अभ्यासदौऱ्यामुळे या संस्थेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. संस्थेच्या जुन्या इमारतीत पाऊल टाकताच एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्यासारखं वाटलं. आम्ही वेगवेगळ्या विभागांना भेट दिली – हस्तलिखित विभाग, ग्रंथालय, संशोधन विभाग, आणि हे पाहताना वेळ कुठे गेला कळलंच नाही!

निखिल गाडगीळ सरांनी संस्थेची माहिती सांगताना हस्तलिखिते जतन करण्याच्या प्रक्रियेपासून, तिथे चालणाऱ्या संशोधन प्रकल्पांपर्यंत सर्व काही सांगितलं. त्यातली काही पुस्तकं आणि ग्रंथ चक्क हजारो वर्षांपूर्वीची होती, ज्यात भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा दडलेला होता.

BORI मध्ये जपलेला हा ठेवा म्हणजे केवळ ग्रंथसंग्रह नाही, तर आपल्या संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आणि इतिहास जतन करणाऱ्या या संस्थेला भेट दिल्याने एक वेगळाच आत्मीय अनुभव मिळाला.





Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल  मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...