Skip to main content

प्राचीन ज्ञानाचा अनमोल ठेवा: भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट

पुणे शहर म्हणजे केवळ शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं ठिकाण नाही, तर इतिहासाच्या गाभ्यात डोकावण्याची संधी देणारं एक अनमोल रत्नही आहे – भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट (BORI). प्राचीन भारतीय साहित्य, हस्तलिखिते, संशोधन आणि अभिजात संस्कृती यांचा अनमोल ठेवा जपणाऱ्या या संस्थेचा एक अभ्यासदौरा मला घडला आणि त्यानंतर या संस्थेबद्दलचं माझं दृष्टिकोनच बदलून गेला.




संस्थेचा गौरवशाली इतिहास

ही संस्था १९१७ साली प्राच्यविद्येचे महान संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्थापन करण्यात आली. संस्थेने भारतीय परंपरा, इतिहास आणि शास्त्र यांचं संरक्षण आणि संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेचा संचालक आणि व्यवस्थापक निखिल गाडगीळ सर यांनी आम्हाला या संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली.

संस्थेच्या स्थापनेमध्ये अनेक अभ्यासक आणि विचारवंतांचा हातभार होता. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीपासून ते वेदविद्या आणि पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासापर्यंत, विविध संशोधन प्रकल्प येथे पार पडले आहेत.


भांडारकर इन्स्टिट्यूटचा ठेवा आणि संशोधन कार्य

BORI कडे भारतातील काही सर्वात मोठे आणि दुर्मिळ प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित संग्रह आहेत. संस्थेकडे १,६०,००० हून अधिक पुस्तके आणि २८,००० पेक्षा अधिक हस्तलिखिते आहेत. यामध्ये संस्कृत, प्राकृत, भारतीय प्रादेशिक भाषा आणि काही युरोपियन भाषांतील प्राचीन ग्रंथांचा समावेश आहे.

संस्थेची वैशिष्ट्ये:

✅ ग्रंथालयात साठवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा
✅ हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी विशेष रासायनिक प्रयोगशाळा
अम्फिथिएटर, जिथे विविध अभ्यासविषयक व्याख्याने घेतली जातात
जैन गार्डन, एक सुंदर आणि शांत परिसर
✅ पांडुरंग वामन काणे – साहित्य क्षेत्रातील भारतरत्न मिळवणारे एकमेव संशोधक


संस्थेमध्ये शिकण्यासारखं काय आहे?

संस्था केवळ प्राचीन ग्रंथसंग्रहासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे विविध अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवले जातात. काही प्रमुख अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत:

📖 वेदविद्या – भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी
📖 भारतीय दर्शनशास्त्र एक परिचय – भारतातील विविध तत्त्वज्ञान शाखांचा अभ्यास
📖 प्रवास महाभारत – महाभारताच्या विविध पैलूंची सखोल माहिती
📖 कालिदास आणि भाषा – संस्कृत काव्य आणि नाट्य परंपरेचा अभ्यास
📖 पुरातत्त्वशास्त्राची मूलभूत तत्त्वे – इतिहास आणि पुराणात रस असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम


महाभारत प्रकाशन आणि निजामाची देणगी

महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या प्रकाशनासाठी संस्थेला हैदराबादच्या सातव्या निजाम मीर उस्मान अली खान यांनी मोठे अनुदान दिले होते. ११ वर्षांसाठी प्रतिवर्षी १००० रुपये आणि अतिथिगृहाच्या बांधकामासाठी ५०,००० रुपये असे मोठे सहकार्य त्यांनी केले होते.

BORI ने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यासाठी विष्णू सीताराम सुखठणकर यांची संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या संशोधनाच्या दर्जामुळे संपूर्ण जगभरातून BORI ला मान्यता मिळाली.


BORI भेटीतील वैयक्तिक अनुभव



रानडे इन्स्टिट्यूटच्या Culture Journalism अभ्यासदौऱ्यामुळे या संस्थेच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. संस्थेच्या जुन्या इमारतीत पाऊल टाकताच एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्यासारखं वाटलं. आम्ही वेगवेगळ्या विभागांना भेट दिली – हस्तलिखित विभाग, ग्रंथालय, संशोधन विभाग, आणि हे पाहताना वेळ कुठे गेला कळलंच नाही!

निखिल गाडगीळ सरांनी संस्थेची माहिती सांगताना हस्तलिखिते जतन करण्याच्या प्रक्रियेपासून, तिथे चालणाऱ्या संशोधन प्रकल्पांपर्यंत सर्व काही सांगितलं. त्यातली काही पुस्तकं आणि ग्रंथ चक्क हजारो वर्षांपूर्वीची होती, ज्यात भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा दडलेला होता.

BORI मध्ये जपलेला हा ठेवा म्हणजे केवळ ग्रंथसंग्रह नाही, तर आपल्या संस्कृतीचा आरसा आहे. प्राचीन भारतीय ज्ञान आणि इतिहास जतन करणाऱ्या या संस्थेला भेट दिल्याने एक वेगळाच आत्मीय अनुभव मिळाला.





Comments

Popular posts from this blog

त्रिशुंड गणपती मंदिर - पुण्याचे दुर्लक्षित रत्न

पुण्यातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर हे एक अनोखे रत्न आहे. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून, त्याच्या स्थापत्यशैलीतून आणि शिल्पांमधून प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या तीन सोंड असलेल्या गणेशमूर्तीमुळे प्रसिद्ध आहे.                सौजन्य : Google.com मंदिराचा इतिहास आणि स्थापत्यशैली मंदिराच्या उभारणीची सुरुवात शहाजीराजांच्या काळात झाली, तर १७७०च्या सुमारास इंदूरजवळील गोसावी भीमनिपजी यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. या मंदिराच्या रचनेत राजस्थानी, माळवा आणि दक्षिण भारतातील वास्तुशैलींचा मिलाफ दिसून येतो. पूर्ण दगडी बांधकाम, उंच प्रवेशद्वार आणि दाराच्या चौकटीवरील शिल्पे यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेला वेगळेपण प्राप्त झाले आहे.             सौजन्य : Google.com प्रवेशद्वारावरील शिल्पे आणि राजकीय दृष्टिकोन मंदिराच्या प्रवेशद्वारावर विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत - शेषशायी विष्णू, यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर आणि दशावतार. मात...

एक प्राणी लुप्त होत चालला आहे

लिहिण्यास कारण की आताची सद्यस्थिती: आजकाल जो प्रयत्न चालू आहेना जशी की डायनासोर प्रजात निसर्गाने लुप्त केली. आता माणूस अग्रेसर भूमिका घेऊन तसे हा प्राणी लुप्त करायचा प्रयत्न महाराष्ट्रात चालू आहे, त्यात अग्रेसर असणारे काही प्रमुख हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा, हॉटेल अंबादास अन् हॉटेल 7777 आणि असेच अनेक भरपूर नग आहेत. नाद करती काय यावचं लागतंय सात कापले आहेत दुपारून अजून चारचा बेत हाय. हॉटेल कमी अन् कत्तलखाना जास्त वाटतं आहे हे सर्व. खरंतर माझं तसंच मत कारण शेळ्या ही प्राणी शेंडे मारण्यात एक्सपर्ट असते. ज्यांना एक जागी तग धरून खाता येत नाही त्यांना कशाला पाहिजे जास्त आयुष्य.  आर्थिक बाजू आणि शेळ्या: आमच्याकडे 7 ते 8 बोकडे आहेत मटणाची हाइप वाढली तरच मटणाचे भाव वाढतील ना.मग आम्हाला चांगले पैसे मिळतील ना, अन् शेवटी आयुष्यात पैसा महत्वाची गोष्ट आहे. यांना खाली खायला गवत असताना सुद्धा यांना तांगडं वर करून खायच असतं मग कर्म परत येत म्हणतात ते असे,कारण नंतर कापणारे खाटिक याचं तांगडेवर बांधून कापतात. कारण माणूस मुळात निसर्गाचे शोध आणि प्राण्याचे शोध चोरत असतो. सरळ नसणारा वळवळ्य...

अर्थसाक्षरतेसाठी एक पाऊल पुढे – पुणे विद्यापीठाचे अर्थसंकल्पीय प्रदर्शन

  केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26: पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम दरवर्षी अर्थसंकल्प सादर होतो, परंतु तो सर्वसामान्य नागरिकांसाठी समजणे कधीही सोपे नसते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी यंदा हा दुरावा मिटवण्यासाठी एक अनोखी संकल्पना राबवली. त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित एक विशेष प्रदर्शन भरवले, जिथे अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना समजावून सांगण्यात आले. प्रदर्शनाची संकल्पना आणि उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातील गुंतागुंतीच्या संकल्पना आणि धोरणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अर्थसंकल्पातील शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांवर चर्चा केली. प्रदर्शनातील ठळक वैशिष्ट्ये या प्रदर्शनात अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील महत्त्वाच्...