Skip to main content

पथनाट्य – समाजप्रबोधनाचा प्रभावी मंच

सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पथनाट्याला "उत्कर्ष २०२५" या राज्यस्तरीय सामाजिक-सांस्कृतिक स्पर्धेत विशेष स्थान मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील विद्यापीठ संघांनी विविध ज्वलंत सामाजिक मुद्द्यांवर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले.

"झुकेगा नही साला" - सोलापूर विद्यापीठ


पथनाट्य : एक सामाजिक चळवळ

रस्त्यावर सादर होणाऱ्या पथनाट्याला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहता येणार नाही. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी पथनाट्य हे एक प्रभावी साधन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश जुलमाविरुद्ध आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध सामाजिक अन्यायांविरोधात पथनाट्याने मोठी भूमिका बजावली आहे. आजही भ्रष्टाचार, पर्यावरण समस्या, आरोग्य जागरूकता, लैंगिक समानता यांसारख्या विषयांवर प्रभावीपणे भाष्य करण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो.

"उत्कर्ष २०२५" मधील प्रभावी सादरीकरणे

या वर्षीच्या उत्कर्ष स्पर्धेत राज्यभरातील सोळा विद्यापीठ संघांनी आपापली पथनाट्ये सादर केली. मर्यादित वेळेत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या कथा रंगविल्या. यातील काही महत्त्वाची पथनाट्ये अशी होती :

📌 "होय, आम्ही आमचं मूळ विसरलोय" – मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांवरील प्रभावी भाष्य (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
📌 "लठ्ठपणा व मधुमेह" – आरोग्याविषयी जनजागृती (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)
📌 "मेंटल हेल्थ" – मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करणारे नाट्य (मुंबई विद्यापीठ)
📌 "झुकेगा नही साला" – भ्रष्टाचारावरील परखड टीका (सोलापूर विद्यापीठ)
📌 "जागर मतदानाचा" – लोकशाहीप्रती जागरूकता निर्माण करणारे पथनाट्य (नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई)

"होय, आम्ही आमचं मूळ विसरलोय" - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


पथनाट्य : समाजपरिवर्तनाची गरज

डॉ. अमित गोगावले यांच्या मते,

"पथनाट्य या शब्दाची फोड करताना पथ म्हणजे रस्ता आणि ज्वलंत प्रश्नांवर मांडलेले नाट्य म्हणजे पथनाट्य. सामाजिक प्रश्नावर प्रभावीपणे भाष्य करणारे माध्यम."
त्यामुळेच समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि समस्यांवर थेट भाष्य करण्यासाठी पथनाट्य आजही महत्त्वाचे आहे.

पुणे विद्यापीठ पोतदार संकुल 


नव्या पिढीने पथनाट्याकडे पाहावे…

पथनाट्य हे केवळ अभिनयाचे साधन नाही, तर ते विचारांना चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. आजच्या पिढीने पथनाट्याला केवळ स्पर्धात्मक उपक्रम न मानता, ते समाजप्रबोधनाचे साधन म्हणून स्वीकारावे. कारण बदल घडवायचा असेल, तर संवाद गरजेचा आहे – आणि पथनाट्य हा संवाद घडवण्याचा सर्वांत प्रभावी मंच आहे!


Comments

Popular posts from this blog

मराठा आरक्षण: कल्पित सत्य की क्रांतीची ठिणगी?

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षण हा मुद्दा केवळ एक धगधगता प्रश्न नाही, तर तो एक ज्वलंत जखम आहे जी दर काही वर्षांनी उघडी होऊन लाखो लोकांच्या जीवनाला हादरवते. हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही; तो आर्थिक असुरक्षा, जातीय अस्मिता, राजकीय खेळ आणि सामाजिक न्यायाच्या गुंतागुंतीचा एक प्रचंड जाळ आहे. हे आंदोलन नव्या वळणावर आहे – सरकारी GR, OBC च्या विरोधी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अथक लढाईने राज्यात नवे तणाव निर्माण झाले आहेत. खरंच, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का? की हे एक राजकीय सापळा आहे ज्यात भावनांचा गैरवापर होतो? या लेखात आपण या मुद्द्याचा ऐतिहासिक प्रवास, सामाजिक-आर्थिक वास्तव आणि संविधानिक वाद यांचा गहन अभ्यास करू. हा अभ्यास केवळ तथ्यांवर नाही, तर न्यायालयीन निर्णय, आयोग अहवाल आणि सध्याच्या घटनांवर आधारित आहे. चला, या संघर्षाच्या मुळाशी जाऊया – जिथे न्याय आणि राजकारणाची टक्कर रोज घडते.ऐतिहासिक प्रवास: एक अथक संघर्षाची गाथामराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात १९८० च्या दशकात झाली, जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशींनी देशभरात OBC आरक्षणाची लाट उसळली. ...

सोलापूरमध्ये आलेलं "अशोक कामटे" नावाचं वादळ...!

धडाकेबाज, धाडसी,साहसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान अधिकारी सोलापूरने पहिला म्हणजे "अशोक मारुतीराव कामटे" एवढी विशेषण never fails म्हणजे हा अधिकारी. आज सोलापूरच्या सिटी बसमध्ये साहेबांचा फोटो पाहिला की वाटतं अस्थिर सोलापूर लोकांना स्थिर करण्यासाठी सात दिवस 144 संचारबंदी करणारा, अधिकारी पण गाडीत बसून नाही "Leading by front" त्यांनी सोलापूरमधली गुन्हेगारी, मगरूरी नेस्तनाबूत करून टाकली. देशसेवा रक्तात असणारा अधिकारी कारण आजोबा महाराष्ट्राचे पहिले IG होते अन् वडील आर्मीमध्ये लेफ्टनल कर्नल होते. त्यामुळे रक्तात वारसा आहे देशसेवेचा २००९ साली मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक किस्सा आहे कर्नाटक भागातला आमदार रविकांत पाटील हा सोलापूरमध्ये मोठ्या आवाजात 10 च्या वेळेनंतर DJ वाजवत होता. पोलिसांना ऐकत नव्हता. हे त्यांना वॉकी - टॉकीद्वारे समजलं तडक येऊन धडक मारून घरातून ओढून स्ट्रेचर नेण्याची जबाबदारी साहेबांनी पार पाडली. रविकांत पाटीलसारखा बाहुबली मांजर केल्यामुळे सोलापूर शांतीचा संदेश घेऊन संत झाले अशोकराव तुम्हा कारणी.  सौजन्य: संग्रहित छायाचित...

आठवण तात्याची.....

एक वरीस सरल  मित्रा एक वर्ष झालं तिथीप्रमाणे आज ती रात्र आठवली अश्रू अनावर होतात. सुचेना झालं होतं, मिथ्य वाटतं सगळ म्हणजेच खोटं वाटतं होतं. नेहमी प्रमाणे पाडव्याच्या आधी मामाला कपड्याला पैसे पाठव असं कॉल केला होता त्यात मामा बोलला की "अरे सारंग, सोलापूर ला आलो आहे रे" मला प्रश्न पडला लक्षीपूजनाला दुकान सोडून मामा सोलापूला का गेला आहे मग मी विचारलं का त्यावर मामा बोलला "महादा आबाच्या पोराला शॉक लागला आहे, कंडीशन लय क्रिटिकल आहे" असं बोलला अन् फोन ठेवला. मला चैन पडेना मग मी लगेच कॉल केला अन् विचारलं "डॉ काय म्हणत आहेत, खूप क्रिटिकल आहे का" मामा बोलला "अरे तात्या गेला" एका क्षणात सगळं हरवल्यासारखं वाटलं. दिवाळीमुळे दीदी पाशी कात्रज होतो रात्र झाली होती लगेच निघालो सोलापूर जाण्यासाठी जास्त खचू नको दीदी सांगत होती. तसाच मी ट्रेन पकडून सोलापूरला आलो. तात्या येईपर्यंत त्याच्या घराकडे जाण्याची हिम्मत झाली नाही. त्याला आणल्या नंतर ज्याला कायम गावच्या कार्यक्रमात मी उत्सवमूर्ती पाहिलं होत जो कायम लेझिम पुढे असणारा शिटी देऊन स्टेप बदलणारा म्होरक्या, क्रिके...